Ration Card : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ नुसार महाराष्ट्रासाठी ग्रामीण भागासाठी ४६९.७१ लक्ष आणि शहरी भागासाठी २३०.४५ लक्ष असे एकूण ७००.१६ लक्ष लाभार्थ्यांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. सदर मर्यादा पूर्ण झाल्यामुळे नव्या लाभार्थ्यांचा समावेश शक्य होणार नाही. त्यामुळे शासनाने अपात्र लाभार्थ्यांना वगळण्याचा निर्णय घेतला आहे.
